अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ अकाेल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की राज्यात काेराेना आटाेक्यात आला आहे. अजून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे भाजपावाले सरकार पाडण्याचे राेज मुहूर्त काढत आहेत. त्यांच्या मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीकडे वाटचाल केली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आराेप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विराेधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेल्या नेत्यांना आता आपली मुस्कटदाबी हाेते असे वाटत आहे, तर उपऱ्यांना पदे मिळाली व भाजप निष्ठावंत उपेक्षीत राहिले, अशी भावना त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांची आहे. असे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. सध्याच किती आहेत, याचा आकडा जाहीर करणे याेग्य नाही; मात्र अशा काठावरच्या आमदारांना दिलासा देण्यासाठीच आमचे सरकार येणार, अशी बतावणी भाजप करीत असल्याचाही आराेप जयंत पाटील यांनी केला.
0 Comments