जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर गिरणा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन व त्याची अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात येऊन तपासणी करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा व महसुलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.
0 Comments