गोंदिया जिल्ह्यातील जरताळ येथील गुलाब रमेश अजितवार यांनी दुसऱ्या जातीच्या तरुणीशी नागपुर येथे 17 ऑक्टोबर रोजी लग्न केले. लग्नानंतर 9 डिसेंबर रोजी ते गावात परत आले. पण गावात आल्यानंतर 15 डिसेंबर रोजी दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केले म्हणून गावात शिक्षेसाठी कतिया समाजाची जातपंचायत भरली. यामध्ये दंड रूपात 1 लाख ते 50 हजार रुपये दंड ठोठावला गेला. मात्र आपण गरीब असल्याने केवळ एक हजार रुपये भरु शकत असल्याचे पीड़ित गुलाब यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे गुलाब यांना मदत करणाऱ्या मनोज अजितवार ह्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. पण पैसे भरु न शकल्यामुळे पीड़ित गुलाब, अजितवार यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले. गावाने त्यांना वाळीत टाकल्याचा आरोपही गुलाब यांनी केला आहे. याप्रकरणी गुलाब यांचे मित्र मनोज अजीतवार यांनी दिलेल्य़ा तक्रारीवरुन 3 व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
0 Comments